आयुष्यात एखादी व्यक्ती असतेच आपण त्या व्यक्तीचा अंत मान्य करत नाही त्या व्यक्तीचा जाणं आपल्याला मान्य नसतं त्या व्यक्तीवर आपला खूप विश्वास असतो, खूप प्रेम असतं. ती व्यक्ती आपले सर्वस्व असतं .आपण त्या व्यक्ती साठी काहीही करायला तयार असतो, ती व्यक्ती म्हणजे आपल्या जगण्याची सवय असते आपण म्हणत असतो तु जेव्हा जाशील तेव्हा मला पण सोबत घेऊन चल, मला नाही राहता येणार तुझ्याशिवाय. ती व्यक्ती, म्हणते तसं नसतं बाळा !आपल्याला वाटतं त्या व्यक्तीने यावं परतुनी माघारी आपल्यासाठी, कायम आपल्यासोबत असण्यासाठी. Miss u so much at everyday at every moment... My grandmother.. ❤
ऐकू कमी येणाऱ्यांसाठी कानाचे मशीनजर तुमच्या घरात कींवा आजूबाजूला वयस्कर व्यक्तीला ऐकू कमी 👂 येण्याची समस्या असेल व त्यामुळे त्यांचा स्वभाव अबोल 😷 कींवा चीडचीडा 😠 झालाय ... तर अशा वयस्कर आजी - बाबां साठी `व्हिआर हेअरिंग` च्यावतीने ऐकू कमी येणाऱ्या व्यक्तींसाठी खास कमी दरात कानाचे मशीन उपलब्ध करून दीले जात आहेत तेही50 वर्षापासून हीअरींग सोल्यूशन वर काम करणार्या कंपनीचे -स्पष्ट आवाज, वापरायला खूप सोपे,ऑन -ऑफ स्वीच, व्हॉलूम कंट्रोलआकर्षक डीझाइन आणि2 वर्ष वॉरंटीचे 3 मॉडेेल कमी कीमतीत उपलब्ध - 5999/6999/9999 रूमल्टी-डिजीटल श्रवण यंत्र 15999/- पासुन ते 3लाखा पर्यंतमशीन बद्दल अधिक माहीती व डीझाईन बघण्यासाठी सोबत खलिल फोटो पहावे कमी ऐकू येण्यामुळे खुप माणसीक त्रास सहन केलाय त्यांनी ..... आता मात्र अजून उशीर नको ....आधिक माहिती साठी सम्पर्क 9657-588-677
डॉक्टर राजेश बर्वे या व्यक्तिमत्त्वाला मी सर्वप्रथम भेटलो १९९३ साली. आणि त्यानंतर मीच नव्हे तर माझ्या परिवारातील सारेच त्यांच्या उपचाराचे fan झालो. अगदी क्रमच लावायचा झाला तर सर्वप्रथम माझी मुलगी ,नंतर मी , मग माझा मुलगा आणि पत्नी असे सगळेच त्यांचे fan patient झालो.वीले पार्ले पूर्वेला पार्लेश्र्वर मंदिराच्या जवळील गणेश प्रसाद या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या क्लिनिक मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा दाखल झालो तेव्हा बाहेर तीन चार रुग्ण बसलेले होते. या फ्लॅटच्या अर्ध्या भागात सुरेश बर्वे (डॉक्टरांचे वडील) यांची आर्किटेक्चरल फर्म आहे.क्लिनिकच्या काचेच्या दरवाजावर नाव होतं,डॉ.राजेश बर्वे , B.H.M.S.डॉ.वृषाली राजेश बर्वे B.H.M.S.(पुढे होमिओपॅथी मध्ये दोघांनीही M.D. केलं ) आमचा नंबर आल्यावर आम्ही आत गेलो आणि डॉक्टर राजेश बर्वेंचं पाहिलं दर्शन झालं. गोरेपान , मध्यम उंची , मोठे घारे डोळे , चेहेऱ्यावर मार्दव , असे डॉक्टर राजेश पहिल्याच दृष्टीत आपलेसे झाले. गम्मत म्हणजे प्रथेप्रमाणे डॉक्टरांना पाहून मुलं भोकाड पसरतात किंवा घाबरून जातात तसं मुलीने काहीही केलं नाही. ती फक्त त्यांना एकटक पहात होती.होमिओपॅथी उपचाराच्या नियमाप्रमाणे डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले , आमच्याकडून आलेल्या उत्तराना जाणून घेतलं. केसपेपर लिहिताना दिसलं ते त्यांचं सुंदर हस्ताक्षर. डॉक्टरांच्या बोलण्यात आम्हाला एक प्रकारचा विश्वास जाणवत होता. त्यावेळी डॉक्टरांकडे कंपाऊंडर नव्हता. त्यामुळे तपासण्याचा कार्यभाग आटोपल्यावर बाहेर येऊन तेच औषध देण्याचं काम करत होते. डॉक्टरांच्या प्रत्येक क्रियेत म्हणजे आजार जाणून घेण्यात , प्रश्न विचारण्यात , आम्ही दिलेली उत्तरं टिपून घेण्यात , निदान करण्यात ते अगदी औषध बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत एक व्यवस्थितपणा आणि शिस्तबद्धता होती. कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन जाणवत नव्हता.आता या सगळ्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ.बर्वे कुटुंब पार्ल्यामध्ये खूप वर्षांपासून राहत आहे. डॉक्टरांचे आजोबा तर पार्ल्यातील पूर्वीच्या काही प्रतिष्ठित सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी पार्ल्यावर एक पुस्तकही लिहिलं होतं. आजोबा दिसायलाही गोरेपान आणि सडसडीत देहयष्टीचे होते. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मला कसं कळलं . तर त्याचं उत्तर पुढे येईलच. डॉक्टरांचे वडील सोडले तर सगळे बर्वे कुटुंबीय अत्यंत उजळ वर्णाचे. डॉक्टरांचे वडील , भाऊ आणि वहिनी तिघही वास्तुविशारद तर आई आयुर्वेदाचार्य. पार्ल्यातील एक सुसंस्कृत , सुशिक्षित आणि सुपरिचित कुटुंब आहे बर्व्यांचं.आणि त्यानंतर डॉक्टर राजेश बर्वे हे आमचे शब्दशः family doctor झाले. मला हे अगदी मनापासून जाणवलं की त्यांना रुग्णाच्या आजाराची समज अचूक येते. त्यांचं रोगनिदान रुग्णाच्या फक्त इतिहास भुगोलावर न थांबता व्यवस्थित तपासणीनंतर केलं जातं. मला नेमकं नाही सांगता येणार परंतू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुग्णाला हवा असलेला आधार , आशा आणि आस्था या तीनही गोष्टींचं मिश्रण आहे. त्यामुळे आपल्याला काय होतंय हे डॉक्टरना नेमकं कळलय हे समाधान रुग्णांना मिळतं.डॉक्टर राजेश शी हळुहळु आमचा घनिष्ट संबंध जडला. तपासणीनंतर मोजक्याच अवांतर गप्पा व्हायच्या.ते हाडाचे शिक्षक आहेत. विरारला असलेल्या होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयात अध्यापक तसच अस्थिरोग , संधिवात बाह्यरुग्ण विभागाचे विभाग प्रमुख (HOD) म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय असलेले डॉ. राजेश आपल्या पेशाला व्यवसाय न मानता एक सेवा म्हणून त्याकडे पहातात.डॉक्टरांच्या आजोबांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला होता त्यावेळी संपूर्ण बर्वे कुटुंबाला पाहण्याचा योग आला. अत्यंत मितभाषी , शिष्टाचार पाळणाऱ्या , सुसंस्कृत आणि जमिनीवर पाय घट्टपणे रोवून असलेल्या कुटुंबाला पहण्याचं आणि भेटण्याचं समाधान मिळालं.डॉक्टरांना अधिक जाणून घेण्यासाठी दोन किस्से सांगतो ,एका श्रीमंत वस्तीत आपलं क्लिनिक असलेल्या डॉक्टरांच्या एका मित्राचा एक धनाड्य इसम पेशंट होता. बऱ्याच कुबेरांना सतत आपल्याला काहीतरी आजार आहे असं उगीचच वाटत असतं. त्याला प्रचंड पैशामुळे येणारी असुरक्षितता हे प्रमुख कारण असतं. त्यानुसार या इसमाला जो काही तथाकथित आजार होता त्यावर त्या डॉक्टर राजेशच्या मित्राचे उपचार सुरू होते. तरीही त्यांनी या आजारावर दुसरं एक मत घ्यायचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी राजेशना या पेशंटला तपासून आपलं मत द्यायला सांगितलं. शिवाय एक टीपही दिली , की फी अगदीच कमी घेऊ नकोस तर जरा जास्तीच सांग (मित्राला डॉक्टर राजेशचा स्वभाव चांगलाच परिचयाचा होता. ) राजेशनी त्या इसमाला तपासून आपलं मत मित्राला कळवलं. त्यांनी फी किती द्यायची हे विचारताच डॉक्टरना मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली. त्यावेळी राजेश आठवड्याच्या औषधांचे तपासणीसह पंचवीस रुपये घ्यायचे. त्यामुळे विचार करून डॉक्टरांनी थोडी जास्त फी सांगितली. दुसऱ्या दिवशी राजेशच्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला ' अरे मी तुला फी जरा जास्तच घे म्हटलं होतं ना '? तो पेशंट मला म्हणू लागला की डॉक्टरांनी फारच कमी फी घेतली. चांगले नाही वाटत हे डॉक्टर. म्हणजे फी च्या आकारमानावर डॉक्टरांना पारखणाऱ्या या लोकांना काय सांगणार.दुसरा किस्सा वेगळा आहे.माझ्या ऑफिस मधला एक happy-go-lucky स्वभावाचा माझा एक सहकारी अचानक खूप तणावात दिसू लागला. निरावानिरविची भाषा बोलू लागला. त्याचं वजनही तणाव आणि कमी आहारामुळे झपाट्याने घटू लागलं. काहीही खाल्ल्यावर त्याला पोटदुखी सुरू होत असे. आणि त्यामुळे त्याला खाण्याची इच्छा होऊनही धीर होत नसे. मी त्याला एकदा डॉ राजेशना सगळ्या रिपोर्ट्स सह भेटण्याचा सल्ला दिला. अर्थात तोपर्यंत त्यानेही एक नव्हे तर दोन ॲलोपॅथी डॉक्टरांना आपली केस दाखवली होती आणि उपचारही सुरू होते. परंतू नेमकं निदान होत नसल्यामुळे उपचारांना यश येत नव्हतं. तो ही अखेर खूप कंटाळून गेला होता. अखेर मी फारच पिच्छा पुरवल्यामुळे शेवटी तो डॉ राजेश कडे येण्यासाठी तयार झाला.डॉक्टरांनी त्याला तपासून महिन्याभरात गुण येईल याची खात्री दिली. फक्त महिनाभर खाण्याची काही पथ्य पाळायला सांगितली. आणि खरोखर महिन्याभरातच माझा हा मित्र पुन्हा एकदा पहिल्यासारखा आनंदी दिसू लागला. आपल्याला या आजारातून सहिसलामत बाहेर काढणाऱ्या डॉ. राजेशना आजही तो खूप मानतो. अर्थात डॉक्टरांचं नेमकं निदान आणि योग्य औषधोपचार यामुळेच हे शक्य झालं.आज डॉ. राजेश बर्वेंचं क्लिनिक पेशंटनी भरलेलं असतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या आजार इथे नक्की बरा होणार हा भाव असतो. आजही डॉक्टर प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित तपासून त्याच्या मनातील रोगाविषयीचा गैरसमज दूर करून मगच औषध देतात. फक्त औषध बनवण्यासाठी आता त्यांच्याकडे कंपाऊंडर आहे . आजही आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस ते होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून राखून ठेवतात. आजही डॉक्टर राजेश बर्वे तसेच आहेत. गेल्या पंचवीस वर्षात मिळालेल्या प्रचंड यशाने त्यांच्या वागणुकीत , स्वभावात आणि रुग्णांना त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवेत कोणताही नकारात्मक बदल झालेला नाही.अनेक संशोधन कार्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये त्यांनी आपले संशोधनात्मक पेपर सादर केले आहेत.डॉक्टरांच्या रुग्णसेवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.वृषाली यांची साथ खरोखर मोलाची आहे.उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ,परंतू सखोल सागर मात्र शांत असतो तसच डॉ.राजेश बर्वेंचं आहे. शांत ,प्रसन्न आणि आश्र्वस्त भाव चेहऱ्यावर ठेऊन ते आपल्या कामात मग्न असतात. आपल्या रूग्णसेवेबरोबरच वेळात वेळ काढून निसर्गसौंदर्य स्थळांना भेट देण्याची मनापासून आवड असलेले डॉक्टर राजेश बर्वे मानवी व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू दाखवून जातात.माझ्या आयुष्याच्या वाटेवर मला जवळून भेटलेले आणि एक माणूस म्हणून भावलेले एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व ,डॉक्टर राजेश सुरेश बर्वे.
रंगपंचमीजागतिक चिमणी दिवस आणि जागतिक जलदिनाचे व्हाट्सअप स्टेटस आता उतरले असतील. त्याचबरोबर या दोन दिवसाचे महत्त्व ही संपले असेल काही मोजके लोक सोडले तर सर्वांना याचा विसरही पडला असेल. चिमणी दिनानिमित्त छतावर पाणी ठेवा म्हणणारे आणि जल दिनानिमित्त पाण्याचे महत्व सांगणारे सोलापूरकर आता रंगपंचमी साठी टँकरची व्यवस्था करत असतील आणि एका कॉलनीत किमान दोन टॅंकर पाणी वापरून रंगपंचमी साजरा करताना दिसतील. सहा दिवसाआड येणाऱ्या पाण्याचे महत्त्व जाणणारे, सोलापूरकर रंगपंचमीच्या संध्याकाळी अर्धा बॅरेल भर पाणी रंग उतरण्यासाठी पाणी वापरतील, हे तेच लोक असतात जे जलदिनानिमित्त पाण्याचे महत्व सांगणारे स्टेटस ठेवतात.Leaving no one behind ही थीम घेऊन या वर्षीचा जल दिन साजरा करण्यात आला म्हणजेच कोणीही पाण्यावाचून वंचित राहता कामा नये, प्रत्येकाला पाणी मिळवून देणे हे आपलं कर्तव्य आहे . यात माणसाबरोबर पशुपक्षी ही आले, त्यांना ही पाणी मिळालच पाहिजे, त्यांचा ही पृथ्वीवरील पाण्यावर समान हक्क आहे . जर पृथ्वीवरील पशुपक्षी झाडे जंगले व्यवस्थित राहिले तर मानव नावाचा प्राणी व्यवस्थित आनंदात राहू शकतो. पशुपक्ष्यांच्या गरजा कमी त्यांना पाणी ही कमीच लागत तरी आपण त्यांचे पाणी हिरावून घेऊन ते संपवत चाललोय.23 मार्च सर्व भारतीय लोकांचा जिव्हाळ्याचा सण ipl ही सुरू झालंय. 2014 च्या ipl चा एक किस्सा आहे . मुंबई महानगरपालिकेने ipl ला विरोध केला होता, कारण त्या वेळच्या दुष्काळात ipl च्या मैदानासाठी 40 हजार लिटर पाणी लागायचे . म्हणजे रोज 40 हजार लिटर पाणी फक्त मैदान तयार करण्यासाठी जात असे. तो पाण्याचा संघर्ष आजही चालूच आहे असं मला वाटतं. पण संघर्ष आता शेतकऱ्यांचा झालेला आहे मुंबईकरांचा नाही.पृथ्वीवर पाणी किती आहे ?आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे.त्यातील 97 टक्के पाणी हे समुद्राचे खारे पाणी आहे, ज्याचा आपल्याला काही एक उपयोग नाही, उर्वरित तीन टक्के पाणी हे पिण्यायोग्य शुद्ध पाणी आहे. पण यातील दोन टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात स्वरूपात उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवावर उपलब्ध आहे . याचाही आपण वापर करू शकत नाही म्हणजेच आपल्या पृथ्वीवर एक टक्के पाणी आहे जे आपण वापरू शकतो या एक टाक्यातील 0.5 टक्के पाणी हे भूजल स्वरूपात आहे .पिण्यायोग्य 1 टक्के पाण्याचा वापर पृथ्वीवरील पाण्याचा वापर पृथ्वीवरील 753 करोड लोक करतात त्यातील भारताची संख्या सर्वाधिक आहे. भूजलाचा वापर आपण विचार न करता करू लागलो, तर आज आपण जी वीस रुपयाची पाण्याची बाटली विकत घेतो तीच पाण्याची बॉटल पुढे जाऊन आपल्याला दोन हजार रुपये खर्च करायला लागेल, आणि ही परिस्थिती यायला जास्त दिवस शिल्लक उरले नाहीत.भूजल आणि स्मार्ट सोलापूरकरआपलं सोलापूर हे विकासाच्या दृष्टिकोनातून खूप वेगाने पुढे सरकत आहे. स्मार्ट सिटी मध्ये समाविष्ट झाल्यापासून सोलापूर मध्ये खूप बदल दिसून येत आहे. त्यातीलच एक म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सोलापूर ने भीम उडी घेत 54 वे स्थान पटकावले आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण पण शहराचा विकास ज्या पद्धतीने चालू आहे तो पूर्णपणे पर्यावरणाला संपवून केला जात आहे .उदा.समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो झाडाच्या कत्तली अक्कलकोट आणि मंगळवेढा मार्गावर केल्या गेल्या आहेत. या झाडांमध्ये वड, पिंपळ, चिंच इ. देशी झाडांचा समावेश होता ही झाडे किमान 50 ते 60 वर्षे जुने होते.म्हणजेच विकास करत असताना सोलापूरकर आणि प्रशासनाला पर्यावरणाचा विसर पडला की काय ? असा प्रश्न निर्माण होतो .अशीच अवस्था भूजलाची ही झाली आहे. आज सोलापुरात नवनवे इमारती उभारत आहेत, त्यासाठी लागणारे पाणी म्हणून भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा वापर शहरा बरोबर ग्रामीण भागातही कृषी उद्योगासाठी व पिण्यासाठी म्हणून भूजलाचा वापर केला जातोय. आज सोलापूर शहरात दररोज प्रायव्हेट कन्सल्टान्सी द्वारे किमान पंचवीस ते तीस भूजल सर्वे केले जातात आणि त्यातील दहा ते पंधरा लोक नवे बोअर सुरू करीत आहेत. ही परिस्थिती शहराचे झाली यापुढे जाऊन जर जिल्ह्याचा विचार केला तर, आज दररोज सोलापूर जिल्ह्यात 300 ते 400 भूजल सर्वे होतात आणि त्यातील किमान शंभर नवे बोर सुरू केले जातात. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी भूजल साठा संपून जाईल. भूजलाच्या वापराला माझा विरोध नाही, पण आपण निसर्गाकडून घेतलेल्या या पाण्याचा योग्य वापर करीत नाही, त्याचबरोबर भूजल पातळी वाढवण्यासाठी काही उपाययोजनाही करत नाही. साधी गोष्ट आहे, आपण जरआपल्या शेजारच्याच्या भांड्यात एखादी वस्तू आपल्या घरात आणली तर ते भांडण परत देताना, आपण त्या भांड्यात काहीतरी वस्तू किंवा पदार्थ भरून आपल्या शेजार्‍याला देत असतो. ही आपली संस्कृती आपल्याला सांगत सांगते. पण निसर्गाच्या बाबतीत आपण आपली हीच संस्कृती विसरून गेलोय. निसर्गाच्या भांड्यातून आपल्याला लागेल तेवढं लागेल तसं उपसून घेतोय पाणी आणि त्या निसर्गाच्या भांड्याला रिकामा सोडून देतोय.आज निसर्गाच्या त्या भांड्याला पुन्हा भरण्याची वेळ समोर आलेली आहे. रंगपंचमी मध्ये अशे अनेक व्यक्ती आपल्याला दिसतील जे बोर चालू करून हजारो लिटर पाणी वाया घालवून पाण्याची नासाडी करून रंगपंचमी साजरी करतात. त्यांना समज देण्याची त्याचबरोबर भुजलाचे महत्व सर्वांना पटवून देऊन भूजल पातळी कशी वाढवावी हे सर्वांना सांगणे गरजेचे आहे.2019 आणि रंगपंचमीरंगपंचमी आपण दरवर्षी साजरी करीत असतो मजा करीत असतो , पण रंग खेळून झाल्यावर तू चढलेला रंग उतरवण्यासाठी आपण किमान चार बादल्या पाणी वापरतो. तरी रंग काही उतरत नाही त्या रंगलेल्या चेहऱ्याने रंगलेल्या बोटांनी आणि बोटांच्या नखांमध्ये ही शिल्लक राहिलेल्या रंगासोबत आपण ऑफिसला जातो, मुख्यता विद्यार्थी परीक्षेला जातात त्यांना त्यांची ओळख द्यावी लागते परीक्षेला बसण्यासाठी त्याच रंगलेल्या हाताने आपण जेवण हे करतो आणि नंतर ना आजारीही पडतो ,हे आपण टाळू शकतो. जर आपण रासायनिक रंगा ऐवजी नैसर्गिक रंगाचा आणि कोरड्या रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी केलात तर. पाण्याचा कमीत कमी वापर आपण करायला शिकलो पाहिजे. यावर्षीच्या रंगपंचमीत आनंदाचे रंग उधळूयात आणि पाणी वाचवूया त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करूयात .सर्वांना दाखवून देऊयात की फक्त आमचं शहर स्मार्ट झालं नाही, तर आम्हीसुद्धा स्मार्ट झालोय.स्मार्ट सोलापूर बरोबर स्मार्ट सोलापूरकर ही निर्माण झाले.
परिपाठ संपला अन् सारी मुले रांगेने वर्गात गेली. मी देखील कार्यालयात जाण्यासाठी पाऊल उचलले तोच माझ्या पहिलीच्या वर्गातील मुलांचा आरडाओरडा ऐकू आला . कुणी भितीने रडत होते तर कोणी घाबरून दूर पळत होते . काही जण 'मॅडम ,मॅडम ' मला बोलवत होते. मी तशीच जोराने तिकडे धावले . इतक्यात अर्जुन माझ्याकडे पळतच आला आणि माझ्या हाताला धरून धापा टाकत बोलला ," मॅडम , वर्गात साप आहे. " ऐकून मीही जरा घाबरले पण मुलांसाठी धाडस केले .मुलांना कसेबसे शांत केले अन शेजारीच असलेल्या शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाक गृहातील सरपणाचे एक मजबूत लाकुड घेऊन आले . माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे घाबरलेले चेहरे समोर आले तशी माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली. अर्जुनला सरांना घेऊन येण्यास सांगून मी वर्गात प्रवेश केला अन् माझ्या मुलांना घाबरवणाऱ्या प्राण्याचा शोध घेऊ लागले .पावलांचा जराही आवाज न करता मी मुलांनी अंगुली निर्देश केलेल्या जागेकडे बघू लागले आणि माझ्या काळजात धस्स झाले. गणित कोपऱ्यातील शैक्षणिक साहित्याच्या भरणीजवळ 'तो ' अगदी शांत- निवांत वेटोळे घालून बसला होता . मुलांना मी माझ्या ओठांवर बोट ठेऊन खुणेनेच शांत रहायला सांगितले . त्याला तसा निपचित पाहून मला जरा धीर आला . मी आणखी सावध झाले आणि त्याच्या जवळ गेले . त्याला नीट निरखून पाहू लागले. त्याचा तांबूस ,तपकिरी रंग , त्यावरचे काळे ठिपके पाहून तो ' विषारी नाग' आहे हे कुणीही सहज ओळखले असते.त्याच्या बसण्यावरून आणि फुगलेल्या शरीरावरुन त्याने नक्कीच काहीतरी गिळले असणार याची मला खात्री पटली .आता मी आणखी जवळ गेले. आमच्यातील अंतर 2 फुटाएवढे राहिले असेल. माझ्या मागे माझे 5-6 शूर विद्यार्थी येऊन उभे राहिले अन् तेही ' नागोबाचे ' निरीक्षण करत हळू आवाजात कुजबुजू लागले. तेवढ्यात चौथीला शिकविणारे गणपुलेसर आले . सापाला मारण्यासाठी माझ्या हातातील लाकूड मी त्यांच्याकडे देऊ लागले. तसे ते चार पाऊले मागे सरकले. मी विचारले तर म्हणाले,"माझे नाव महादेव आहे आणि साप न मारण्याचे मी माझ्या आईला वचन दिले आहे." हे ऐकून मला जरा रागच आला . मी जागेवरुनच शाळेच्या गेटकडे पाहू लागले . कुणी ग्रामस्थ मदतीसाठी मिळतोय का याचा शोध घेऊ लागले . मान वळवून वारंवार त्या आगंतुकाकडे पाहू लागले . पुढल्याच क्षणी दोन गावकरी दिसले . मी त्यांना हात वर करून बोलावले पण 'येळ नाही, वावरात निघालो ' असे दुरुनच त्यांनी ओरडून सांगितले. पालकांची उदासीनता पाहून मीही जरा नाराजच झाले . पण वेळ विचार करत बसण्याची नव्हतीच.लगेच माझ्या डोक्यात नागमंत्र्याचा विचार आला. मी मुलांना हळू आवाजात विचारले की आपल्या गावात कोणी मंत्र टाकून साप धरतो का तर मुले नाही म्हणाली. मला तर कुणी सरपमित्रही माहीत नव्हता. 'आता काय करावे' हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. नागाला मारणे मला एकटीला शक्य झाले नसते आणि मला ते पटतही नव्हते .शेवटी मला एक युक्ती सुचली . मी अर्जुनला शैक्षणिक साहित्याची एक मोठ्या तोंडाची प्लास्टिकची भरणी रिकामी करायला सांगितली . मी भरणीचे काय करणार याचा अंदाज गणपुले सरांना आला असणार . " मॅडम , राहू दया . आजच्या दिवस ऑफिसमध्ये वर्ग भरवा पण आता इथून चला "आणि ते स्वतः वर्गाबाहेर गेले . माझे 5-6 शूर मावळे सोडून बाकीच्या मुलांना मी गणपुले सरसोबत त्यांच्या वर्गात पाठवून दिले . आता वर्गात मी , नागोबा आणि माझे मावळे होतो . आवश्यक त्या सूचना देऊन मी मावळ्यांना वर्गाच्या बाहेर दारात उभे राहण्यास सांगितले. " सापाने खूप पोटभर खाल्ले आहे . खाऊन तो सुस्तावला आहे . तो पळूही शकणार नाही आणि जर का तो पळालाच तर तुम्ही देखील सरांच्या वर्गाकडे पळा ," असे मुलांना सांगून मी भरणीचे तोंड उघडले. भरणी अत्यंत सावकाशीने नागाच्या पुढे ठेवली . हातातील लाकूड टाकून दिले अन् दर्शक घेतला. दर्शकाच्या साह्याने मी त्याला भरणीत लोटण्याचा प्रयत्न करू लागले. तो एवढा सूस्त झाला होता की फक्त जीभ बाहेर काढून मला घाबरवू लागला . त्याच्या अशा वागण्याने मला आणखी धीर आला आणि एका जोराच्या फटक्यात सापाला भरणीत लोटले. झटक्याने भरणीचे तोंड झाकण लावून बंद केले . मावळ्यांना तिथेच थाम्बायला सांगून मी तितक्याच घाईने शाळेच्या मागे जरा दूरवर असलेल्या ओढ्याकडे गेले . सावधगिरीने भरणीचे झाकण उघडले . उघडी भरणी तशीच खाली ठेवली अन् मागे वळून न बघता शाळेकडे धावले.~~~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखनशीला अम्भुरे बिनगे(साद)परतुर ,जालना
मुंबापुरीत अनेक व्यक्ती विविध व्यवसायात , अनेकविध क्षेत्रात व्यस्त आहेत. मी स्वतः एका विदेशी बँकेत वीस वर्ष चांगल्या पदावर काम केलं. आपण ज्या क्षेत्रात रोजीरोटी कमावतो त्या कामाला पूर्ण न्याय देतो का ? आपल्या कामात तन मनाने सामावून जाणं फारच थोड्यांना जमतं. कलेच्या प्रांतातही आज हेच चित्र दिसतंय. चटकन पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापायी कलेमधला आत्माच हरवून जातोय. आणि कलाकार ओरड करतात ' रसिक आम्हाला स्वीकारत नाहीत '. परंतू कलेशी प्रामाणिक राहून काही केल्यास रसिक त्याचं स्वागत मनापासून करतात हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे.हे सगळं लिहिण्याचं कारण असं की अशा एका हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत , उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतातील ज्येष्ठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात येण्याचं भाग्य मला लाभलं आहे.माझ्या वडिलांना असलेली वाचनाची आवड कुटुंबात साऱ्यांमधेच निर्माण झाली. वडिलांकडे विविध प्रकारच्या मराठी , इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील दिड ते दोन हजार पुस्तकांचा संग्रह आणि व्यासंग होता. नोकरी सांभाळून थोडं लेखन, काव्य तसच संगीत कार्यक्रमाचं संहिता लेखन निवेदन हा माझा छंद होता आणि अजूनही आहे. एका संगीत कार्यक्रमाचं निवेदन करत असताना प्रदीपजीना जवळून पाहण्याचा योग आला. दुसऱ्या दिवशी मला फोन आला ' मी प्रदीप धोंड , आपल्याला भेटायचंय . कधी याल ? मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर अनेकदा भेटत राहिलो , इतकंच नव्हे तर त्यांच्या संगीत परिवारात मिसळून गेलो.संगीतनिष्ठा म्हणजे काय हे मला प्रदीपजींकडे गेल्यावर समजलं. दिवसाचे अक्षरशः चोवीस तास संगीत हा विषय डोक्यात असणारा हा कलावंत मनापासून रमतो आपल्या संगीत परिवारात. सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास लागलेल्या या व्यक्तीला , त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी काही काळ जावा लागतो. दहिसर स्थित प्रदीप धोंड हे एक संवेदनशील संगीतकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्यांनी सन्मानित झालेल्या प्रदीपजीना नामवंत गुरूंचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. अथक रियाजबरोबर गोड आणि सुश्राव्य गळ्याची देणगी लाभलेल्या प्रदीपजींची ख्याल गायकी रागांची नेमकी बांधणी स्पष्ट करत अप्रतिम सौंदर्याचं रूप घेऊन रसिकांसमोर येते. परंतू प्रदीपजींचं वेगळेपण मला जाणवलं ते त्यांच्या संगीत परिवारातील सहकारी , शिष्यांना पुढे घेऊन जाण्याच्या विचारामुळे. त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. व्यासपीठावर येताना काही वेगळ्या संकल्पनेसहं त्यांनी रसिकांसमोर यावं या विचारातून ते अनेक संगीत कार्यक्रमांची बांधणी करत असतात. ' साद निसर्गा ' या निसर्गाचे विविध भाव दाखवणारा तसच संहितेमधून पर्यावरणासारखा महत्त्वाचा विषय मांडणारा संगीत कार्यक्रम आठ ते सोळा वयोगटातील बाल कलाकारांना घेऊन त्यांनी सादर केला. विविध प्रचलित मराठी निसर्ग गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला मुंबईत रसिकांचा सुंदर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ' साद विधात्या ' या कार्यक्रमातून प्रतिभावान कवींची अप्रचलित गीतं जी प्रदीपजींच्या संगीत प्रतिभेने सजली होती अशा भाव, भक्तीगीतांना एका संकल्पनेत गुंफून हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी रसिकांसमोर आणला. अप्रचलित गीतं असल्यामुळे हे एक धाडसच होतं. पण प्रदीपजी निश्चिंत होते. रसिकांनी या ही कार्यक्रमाला मनापासून उपस्थिती आणि दाद दिली. या दोन्ही कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि निवेदन करण्याचं भाग्य मला मिळालं. प्रदीपजींनी संगीतबद्ध केलेल्या अनेक ध्वनिफिती प्रसिद्ध कंपन्यांनी प्रदर्शित केल्या आहेत.परंतू या साऱ्याचा मुकुटमणी शोभावा असा प्रदीपजींच्या संगीत आणि गान प्रतिभेची साक्ष देणारा एक कार्यक्रम गेली अनेक वर्ष मुंबईत आणि मुंबई बाहेरही अनेक ठिकाणी सादर होत आहे , 'गीतगीतामृत '. भगवद्गीतेचा गीतमय आविष्कार असा हा संगीत कार्यक्रम पहाणं आणि ऐकणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद आहे. कॅनडास्थित कविवर्य ना.भा. दातार यांच्या 'गीतगीता' या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम अप्रतिम चपखल शब्दरचना , कर्णमधुर संगीत आणि अजोड सादरीकरण यामुळे रसिकांच्या मनावर कायमचा कोरला जातो यात तिळमात्र शंका नाही. तीन तास आपल्या भावपूर्ण आणि गोड गळ्यातून भगवद्गीतेसारखा थोडा क्लिष्ट विषय रसिकांसमोर सादर करताना प्रदीपजींच्या चेहऱ्यावर दिसणारा अलौकिक भाव मी निरखला आहे. या अप्रतिम कार्यक्रमासाठीही सुसंवादन करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. भावपूर्ण गायन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी संगीत साधकांना प्रदीपजींचा हा कार्यक्रमएक वस्तुपाठ आहे.संगीत कलेकडे प्रदिपजीं पैसा मिळवण्याचं साधन म्हणून पहात नाहीत. कार्यक्रम उभे करताना स्वतः आर्थिक झीज सोसून इतर कलाकारांना मोबदला मिळावा म्हणून ते प्रयत्नशील असतात.संगीत कलेला जीवन मानणाऱ्या प्रदीपजींना आपल्या परिवारातील सहकारी , शिष्यांना घेऊन गप्पांचे फड जमवण्याची , निसर्ग संनिध्यात फिरायला जाण्याची आणि खावैयेगिरी करण्याची मनापासून आवड आहे. प्रदिपजींचे गुरु चंद्रकांत पारकर यांनी स्थापन केलेली स्वरसाधना विद्यालय ही संस्था १९९१ सालापासून अगदी आजपर्यंत साधकांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची संथा देत यशस्वीपणे उभ्या आहेत.त्यांच्या या वाटचालीत मला सामील होता आलं हेच माझं भाग्य.
प्रत्येक नात्याला जस एक नाव असत तस प्रेम म्हणलं कि आपल्याला दोन भिन्न व्यक्तींनी एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारणे आणि एकमेकांचा सोबतआनंदाने राहणे हे आठवत. पण प्रेम यापेक्षा पण खूप काही असत. ते आई वडील आणि मुलांमध्ये असणार मायेचं प्रेम असेल किंवा मग नवरा बायको मधले सुखद क्षण असतील. प्रेम म्हणजे दोन मैत्रिणीं मधलं घट्ट मैत्रीचं नातं असेल किंवा मग दोन मित्रां मधलं काट्यावर बसून चहा घेताना मारलेल्या गप्पांमध्ये दडलेलं असेल. प्रेम म्हणजे बहीण भावातील एक घट्ट वीण असते किंवा मग आयुष्याचा वळणावर अनेक अनोळखी माणसं भेटतात आणि मग नकळत आपलीच होऊन जातात अशा अनामिक नात्यामधले बंध. अगदी एखाद्या मुक्या जनावराला घरी आणावं आणि त्यांनी आपल्याला जीव लावावा हे पण प्रेमचं.प्रेमाची अनेकरूप असतात. आपण आपल्या घरावर किंवा आपल्या घरातली प्रत्येक वस्तूवर करतो ते प्रेम. आईनी मुलांना एखाद्या चुकीसाठी ओरडाव आणिआज्जीनी "जाऊ दे गं! लहान आहेत" असा म्हणून आपल्या पदराने डोळे पुसावेत ते प्रेम. आजोबांचा चष्मा लावून आजोबांची नक्कल करणे आणि मग त्यावर आजोबांनी नातीची बाहुली हातात घेऊन "हि माझी" म्हणणं हे प्रेम. दुसऱ्या घरातून सून म्हणून आलेली मुलगी त्या नव्या घराला, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करते हे प्रेम. एखाद्या गोष्टी साठी वडिलांनी कान धरून दिलेली समज आणि मग त्याच वडिलांची रात्र भर होणारी घालमेल आणि नकळत डोळ्यांचा कडा जेव्हा ओलावतात ना ते प्रेम. अनोळखी म्हणून यावं आणि कधीही न तुटणारे असे बंध निर्माण झालेले शेजारी म्हणजे प्रेम. वयस्कर आई वडिलांना खाण्यापिण्याची पथ्य पाळायला लावणं हे मुलांचं प्रेम असत. पण तेच त्यांचा शेवटचा दिवसात कोणत्याही पथ्य, बंधनां शिवाय तीच मुलं त्यांना हवं ते सगळं खाऊ देतात हे देखील प्रेमचं असत. कारण दोन्ही परिस्थिती मध्ये त्यांना आपल्या आईवडिलांची काळजी असते आणि त्यांचा सहवास जास्तीत जास्त हवा असतो. या शिवाय प्रेम वेगळं कायअसतं? प्रेम हे स्पर्शातून कळत. डोळ्यात दिसतं. कधी एक ही शब्द न बोलता सगळं सांगून जात तर कधी ते व्यक्त करायला शब्द कमी पडतात. कधी ते कोमल स्पर्शून कळत तर कधी एका स्मित हास्यातुन जाणवत. कधी ते आनंदानी मोहरत तर कधी रुसव्या फुगव्या तून व्यक्त होत. हळू हळू ते मनातून फुलत, सहवासातून बहरत आणि सर्वत्र आनंद पसरवत. प्रेमाची व्याख्या काळाप्रमाणे आणि वयाप्रमाणे बदलत जाते पण त्यातला गोडवा कायम राहतो.
काल्पनिक पत्रलेखनपतंगास पत्रप्रेषकनंदू पतंगवालेकागदी गल्लीफिरकीपुर12345678दि 14/01/2019प्रिय पतंगा,गोड गोड पापा.आज आकाशात तुला उंच उडताना पाहिले अन लगेचच पत्र लिहायला घेतले.मला तू फार आवडतोस. पंख नसूनही तू आभाळात मजेत उडत असतोस.तुझे वेगवेगळे रंग आणि मजेमजेचे आकार मला नेहमीच हवेसे वाटतात. तुझी लांबलचक नागासारखी शेपटी सारखी वळवळत असते. एकदा मी बाबांकडे पतंगासाठी हट्ट केला होता .तेव्हा बाबांनी मला घरच्या घरी पतंग बनवून दिला होता.कागदापासून पतंग कसा बनवायचाहे मी बाबांकडूनच शिकलो .आता मलाही नाना रंगांचे आणि ढंगाचे पतंग बनवता येतात . माझ्या मित्रांचा वाढदिवस असला की मी त्यांना त्यांच्या आवडीचा पतंग बनवून देतो . खूप खुश होतात ते. बरं मला एक सांग की उंच उडताना तुला भीती तर वाटत नाही ना!!! आणि हो...... वर गेल्यावर तुला ढग, पक्षी , विमान या साऱ्यांना अगदी जवळून बघता येत असेल , स्पर्श करता असेल ना !! मज्जा आहे बुआ तुझी. ए....... मलाही कधीतरी तुझ्यासोबत ने ना रे आभाळात . मलाही वरुन खाली बघायचे आहे .उंचावरून माझे जमिनीवरचे मित्र कसे दिसत असतील ते मला एकदा बघायचे आहे . तुझ्या मांज्याची मात्र मला जाम भीती वाटते . एकदा तर माझा हातच कापला होता . तेव्हापासून जरा कमीच पतंग उडवितो मी.आता मी जातो . चंदूला पतंग बनवून द्यायचा आहे . तो साहित्य घेऊन आलाय . टाटा.तुझाच मित्रनंदूप्रति ,पतंगराव शेपटीवालेआकाश विहारउंचवाडी
शीलूताईभूतदया निवासअभयपुर431501दि 19। 12।2019प्रिय ससूल्या,गाजरासारखा गोड पापा.आज चित्रांच्या पुस्तकात तुला पाहिले अन् तुझी खूप आठवण आली प्राणीसंग्रहालयातील तुझी भेट आठवली.म्हणून पत्र लिहायला घेतले.तुझा कापसासारखा मऊ मऊ स्पर्श मला भारी आवडतो बुवा!!! तुझे टुनटुन उड्या मारीत पळणे बघतच राहावेसे वाटते.मन्यासारखे लाल डोळे , छोटे शेपूट आणि उंच कान तुला शोभून दिसतात. पण मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुझा पांढराशुभ्र मळत नाही कसा? तू तर नेहमी मातीत आणि बिळात राहतोस . तू एवढा भित्रा कसा आहेस? तुझ्याविषयी सर्व गोष्टी आईने मला सांगितल्या. मी पुन्हा एकदा तुला भेटण्यासाठी येणार आहे .आता माझी अभ्यासाची वेळ झाली आहे . टाटातुझी मैत्रीणशिलूताईप्रति,ससोबाबिळ बंगलामातीची वाडीरानपुर
प्रेषक,बाली,अभ्यासनगरीयशवाडीदि 12/08/2019प्रिय पेनास,आदराचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा नमस्कार.आज मी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि सर्वात आधी तुझी आठवण झाली . म्हणून मी तुला हे पत्र लिहायला घेतले. मला आठवतो अजूनही तो दिवस. मी बाबांकडे एका नव्या खास पेनसाठी हट्ट करत होते . तो दिला नाही म्हणून मी रुसून बसले होते . माझा तो अबोला असह्य होऊन बाबांनी मला समजाऊन सांगितले , ' अगं छोटी, कोणताही पेन वापरला तरी तुझी हुशारी कमी नाही होणार किंवा वाढणारही नाही . तुझ्या हाताचे वळणच एवढे छान आहे की कोणत्याही पेनने लिहिलेस तरी तुझे अक्षर मोत्यासारखे टपोरे आणि सुवाच्य येणार . पेन हे साधन आहे . तुला मेहनत करुनच सर्व काही साध्य करायचे आहे. तेव्हा पेनच्या आकर्षकतेकडे आणि महागड्या किम्मतीकडे लक्ष न देता मन लावून अभ्यास कर. यश धावत पायाशी येईल.' मला बाबांचे म्हणने पटले. मी पेन या साधनाकडे न बघता त्यातून झरणाऱ्या शब्दांकडे वळले.जेव्हा चौथी बोर्ड परीक्षेत मी पहिली आले तेव्हा मी तुझे अन् बाबांचे मनोमन आभार मानले . तू कसाही असलास तरी लिहिणाऱ्यास प्रामाणिकपणे मदत करतोस. खरंच तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत.तुझे विविध रंग आणि बनावटी आजही मला आकर्षित करतात पण बाबांचे बोल आठवतात.एखाद्या साहेबांच्या खिशात किती ऐटित बसतोस हं तू. तुझ्यामुळेच त्या साहेबीपणाला आणि माणसाला महत्त्व प्राप्त होते. बरं !! एक सांगायचं राहूनच गेलं की . आज निबंध स्पर्धेत माझा पहीला नंबर आला . ही बातमी मी औ बाबांना सांगून येते . तोवर तू इथेच टेबलावर बस. तुझी मैत्रीणबाली.प्रति,पेन(लेखणी)अक्षर निवासशब्दनगरी.
पत्रलेखन शीला बिनगे(साद) 'शारदेय' मेन रोड, परतुर ता परतुर जि जालना 431501 दि. 23/10/2019प्रिय दादू ,सप्रेम वंदे.मोबाइलच्या जमान्यात माझे पत्र पाहून कदाचित तू मला वेडी ठरवशील पण मला माहीत आहे की तुला माझी पत्र वाचायला , टपोरं मोत्यासारखं हस्ताक्षर डोळ्यांनी वेचायला आवडतं ते. म्हणून मीच ठरवले की पत्र लिहून तुला खुश करू.आजच शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्या अन् तुला पत्र लिहायला घेतले.तुला सुट्या लागल्या की तूही लगेचच निघ . भाच्यांसाठी खूप सारे फटाके आणि भेटवस्तू घेऊन ठेवल्या आहेत. त्यांना कधी देतेय असे झालेय बघ. नोकरीच्या निमित्ताने तू विदेशी गेलास . सुखसोयी , भौतिक सुविधा सारं काही तुझ्या पायाशी लोळण घेतंय. तुझं चौकोनी कुटुंब अगदी मजेत आहे हे पाहून बाई(आई)सह आम्ही सारेजण समाधानी आहोत . तरीही तुला डोळे भरून, समोर बसवुन प्रत्यक्षात बोलल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. त्यामुळे तू लगेचच निघायची तयारी कर. दादाला (वडील) जाऊन 2 वर्षे झालीत. बाई एकटी पडलीय आणि तूही विदेशी आहेस. तिला मी आमच्याच् घरी ठेवलंय पण तिला सारखी तुमची ओढ वाटते . तुम्ही येणार म्हणून तिने तयारी सुरु केलीय . झेपत नसतानादेखील तिने सगळे घर झाडून स्वच्छ केले . वाण्याकडे किराणा सामानाची यादी दिलीय. आकाशकन्दिल , पणत्या, फटाके सारं काही आणून ठेवलंय. आता तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय. त्या म्हाताऱ्या डोळ्यांची आस पूरी कराया लवकर ये रे दादू.अरे !!! महत्वाचे तर लिहायचे राहूनच गेले की . आता यापुढे दरवर्षी भाऊबीजेसाठी मी माहेरी येणार नाही. तर तुम्हीच सर्वजण माझ्याकडे यायचय. फराळ, गोड- तिखट जेवणे सारं काही माझ्याच घरी करू. त्यानंतर मग वहिनीला माहेरी जाता येईल . तिलाही तिच्या माहेरी 2- 4 दिवसासाठी जाऊन येऊ दे. बाई कितीही मोठी( मानाने , वयाने , पदवीने) झाली तरी तिला माहेराची ओढ असतेच रे.बरं, आता लेखन थांबवते. तू कधी निघणार आहेस ते कळव म्हणजे मी आमच्या ह्यांना तुला घ्यायला पाठवते. वहिनीला माझा नमस्कार सांग आणि भाचे कंपनीला गोड पापे.तुझी छोटीशीलाता.क.= गुड्डीला मुलगी झालीय . बाळ गुटगुटित आहे.प्रति,संतोष अम्भुरेआर.के .इंटरनॅशनल स्कूल,निअर साऊथ कॅनॉल,टोकियो , जपान
फळ्यास पत्र(काल्पनिक पत्रलेखन)प्रेषकशिलिमाबालांगणकिलबिलवाडीप्रिय फळ्यास,माझा मैत्रीपूर्ण नमस्कार. आज कदाचित मी तुला आठवतही नसेल पण तू मात्र नेहमी माझ्या सोबत आहेस.बालवाडीतील त्या पहिल्याच दिवशी मी जरा नाराजीनेच आले होते पण तुला पाहून खुदकन हसले. तुझा तो सफरचंदाचा आकार आणि काळा कुळकुळीत रंग मला फारच आवडला. त्यावर असलेले हसऱ्या मुलीचे रंगीत चित्र पाहून तर मी जाम खुश झाले . मग मी जागोजाग तुला शोधू लागले . तू सगळ्या भिंतींवर वेगवेगळ्या आकारात छान थाटात बसला होतास.माझी नाराजी तर कुठल्या कुठे पळून गेली. ज्या गोष्टी मला अवघड वाटायच्या त्या तू अगदी सोपे करून समजून सांगायचास . तुझ्यावरची पांढरीशुभ्र मोत्यासारखी टपोरी अक्षरे पाहूनच मी लिहायला अन् वाचायला शिकले. इंग्रजी ,गणित आणि बाकीचे विषयही तुझ्यामुळेच सोपे वाटले.तुझी मात्र कमाल आहे बुवा!! एकाच ठिकाणी बसून कित्ती जणांना तू हुश्शार बनवतोस. कसं जमतं रे तुला हे सारं? ना रागावणं, ना चिडणं फक्त शांत राहून ज्ञान देणं तुला छान जमतं. मला तुझं खूप कौतुक वाटतं रे.काळाची गरज म्हणून तूही स्वतःत बदल करून घेतलेस. ग्रीन,व्हाइट असे तुझे रूप पालटले पण सोपे करून शिकविन्याचा तुझा मुळ स्वभाव , गुण तू सोडला नाहीस . म्हणूनच तू मला आणखी जास्तच आवडू लागलास . मला अजूनही आठवतंय की लहानपणी मी तुझ्या अंगावर रेघोट्या मारायचे,अंक गिरवायचे, चित्र काढायचे. यातूनच मला चित्रकलेचा छंद जडला. असो .पत्र खुपच लांबत आहे . आता लिहिणे थांबवते.तुझी मैत्रीण शिलिमाप्रति,फलकरावशालामंदिरज्ञानगाव~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~एक पत्र माझेशीला अम्भुरे बिनगे(साद)परतुर, जालना
काल्पनिक पत्रलेखनवर्षाराणीस पत्रप्रेषक,शीलूचिंबसेनाप्रमुखदुष्काळवाडीरणरणपूर.प्रिय वर्षाराणी,मला तू जाम आवडतेस बाई.तुझ्यासोबत खेळताना ,भिजताना नि गारा वेचताना खूप खूप मज्जा येते. पण तू काही वेळेवर येतच नाही. नेहमीच वाट पाहायला लावतेस. तुझ्या येण्यानं सारी सृष्टी आनंदात न्हाऊन निघते .झाडे - वेली,पशू ,पक्षी सर्वांची तू तहान भागवतेस. शेतकरीदादा तर तुझी आतुरतेने वाट बघत असतो. आमची चिंबसेना तर आईचा मार आणि बाबांचा ओरडा हसून सहन करतो आणि लपून का होईना तुझ्याशी खेळायला येतो.तू मात्र येतच नाहीस .आम्ही फक्त वाटच बघत बसतो. आता तरी लवकर ये . आम्हा सर्वांनाच तू हवी आहेस. आणि हो ........ आलीस तर आनंदाने ढगांचा ताशा बडवत ये. सगळ्यांना सुखाच्या बरसातीत भिजवून टाक. आमचा राग-राग करू नकोस . हसणारे संसार महापूरात वाहून नेऊ नकोस गं बाई!!!!!बरं ,आता मी पत्र पूरं करते. चिंबसेना कागदी होड्या बनवण्यासाठी मला बोलवत आहे . मी जाते. तू मात्र लवकर ये गं वर्षू !!!!तुझी बालमैत्रिणशीलूप्रति,वर्षाराणीगारवा सदनचिंब गल्लीपाऊसगाव
जीवनला अनेक नवे आहेत ,जीवन खूप सुंदर आहे कुणाला ते थोड दुखाचे वाटते .पाहावे तेवढे सुंदर आणि बघावे तेवढे गंभीर असते जीवन .कोणाला अख्खे आयूष्य तिजोरी चोरापासून लपून ठेवण्यात जाते तर कोणाचे आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात निघून जाते.बाहेर पडलेच कधी तर अनेक प्रश्न दिसतात ,काही रडवतात ,तर काही अंतर्मुख करून जातात .मग सहजच मनाला वाटते ,जे हात भाकरीचा चंद्र शोधते त्याला जर हे अन्न फेकून न देता आपुलकीने खाऊ घातले तर त्यांचे मन किती शांत होईल .ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी आपल्या मानवतेला जागृत करून त्यांना मदत केले पाहिजे .एका माणसाने दुसर्या माणसाच्या दुखात धून जावे ..आयूष्य संघर्षाचे दुसरे नाव आहे .आयुष्य म्हटले कि संघर्ष आलाच म्हणून खचून न जाता मिळून त्याला सामोरे गेले पाहिजे . Adv Vishakha Borkar
प्रेषकनिसर्गराजामु .हरित नगरीपोस्ट वृक्षवल्ली नगरता .धराजि वसुंधरा सृष्टीप्रिय मनुजा,अनेक शुभाशीर्वाद.तुझ्यासाठी मी अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत .त्या तुला मिळत असतीलच हे मला नक्की माहीत आहे .तुझी काळजी करता करता मी स्वतः ला पुरता विसरून गेलोय बघ .आता थोडा अशक्तपणा जाणवत आहे ,ग्लानि आल्यासारखी वाटतेय .तुझ्या आधाराची गरजआहे मला. म्हणून हाती घेतलंय हे पत्र लिहायला.मी तुला तळहाताच्या फोडावानी जपले आणि तू माझ्याशी एवढा निष्ठुर का रे वागतो आहेस!!! आता हेच बघ ना. माझी वनराई तुला सावली , लाकुड,फळे- फुले, औषधी देतात आणि तू मात्र स्वतः च्या फायद्यासाठी त्यांची कत्तल चालवली आहेस. अरे! अशीच वृक्षतोड सुरु राहिली तर तुलाच उन्हाचा त्रास होईल. मग शीतल छाया कशी मिळणार? रसरशित फळे कोठुन खायला मिळणार?प्रसन्नतेसाठी फुलांचा सुगंध कुठून आणशील? त्यामुळे जरा सावर आणि समजून घे माझे महत्त्व.तुझे घर जर कोण्या कारणाने उध्वस्त झाले तर तू किती रडतोस!!! मग माझ्या नसण्याने माझे प्राणी , पाखरे,कीटक कुठे राहतील बरे?? मीच त्यांचा आसरा,निवारा,घर आहे. मी नष्ट झालो तर ते तुला दिल्याशिवाय राहतील का?माझ्या कुशीत शांत पहुडलेला निळा,अथांग समुद्र तुला कधीच काही मागत नाही. तू मात्र त्याला नेहमी त्रास देतोस. घाण पाणी,कचरा ,प्लास्टिक पिशव्या व बॉटल्स आणि तेलकट तवंग यामुळे तो नीट श्वासही घेऊ शकत नाही. समुद्र एकटा दिसत असला तरी अनंत जीवांचा तो पालनकर्ता आहे. तोच असा दूषित झाला तर जे जलचर आहेत त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल...तुला देखील साज शृंगारासाठी रंगीबेरंगी खडे, प्रवाळ,मोती मिळायचे नाहीत.स्वतः साठी म्हणून तरी तू या सागरी संपत्तिचा सांभाळ कर. खळखळ करीत हुंदडणारा खोडकर ओढा, वळणे घेत झुळझुळ वाहणारी अल्लड नदी ,शांत नि पोक्त विहिरी हे सारेजण मिळून तुझी तहान भागवतात आणि तू त्यांनाच छळतोस ! कधी कधी तर तुझ्या या वेडेपणाची दया येते.वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची गरज भासू लागली,घरे कमी पडू लागली.शेती विकून उंचच उंच इमारती बांधल्या. शेतीचे क्षेत्र कमी झाले म्हणून उत्पादन कमी झाले आणि आता तर धान्य आयात करायची वेळ आली. माझे डोंगर तू भुईसपाट केलेस. तिथेही वस्ती करून राहायला लागलास. असे करून तू तुझा विनाश ओढवून घेत आहेस.राहण्यासाठी ,जागेसाठी बेसुमार वृक्षतोड झाली अन् पावसाचे प्रमाण कमी झाले.पाऊस कमी झाला म्हणून शेतीचे उत्पन्न कमी झाले.का समजत नाही तुला ते?मनुजा,अजूनही तू तुझे असे अनिर्बंध वागणे थांबवले नाहीस तर तुझेच नुकसान होणार आहे. माझी हानि होताना पाहून माझे घटक गप्प बसणार नाहीत. भूकंप अतिवर्षण ,अनावर्षण, त्सुनामी, पूर ,दुष्काळअशा अनेक मार्गांनी त्यांनी वचपा काढलाय.पण तुला अजूनही ते कळत नाही.म्हणूनच सांगतोय,आता तरी जागा हो मनुजा. हे सगळे दुष्कृत्य थांबव.झाडे लाव,पाणी अडव,पाणी जीरव,पर्यावरणाचे रक्षण कर,संवर्धन कर.यातच तुझे कल्याण आहे.लक्ष देऊन ऐक जरा-कावळा करतो काव कावम्हणतो माणसा झाड लाव.शेवटी एकच सांगतो की सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी म्हणून तू सर्वश्रुत आहेस .थोडा समजदार बन आणि मला जरा आधार दे.तुझ्याच सेवेतनिसर्गप्रति,मनुजमु.पो.परिसरपुरता.पृथ्वीतलजि.अवकाशनगर~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~एक पत्र माझेशीला अम्भुरे बिनगे( साद)परतुर ,जालना